Menu
Log in


Log in


This section of articles is to collect the information referring to the history we should be proud about. The content will beadded with reference to the source and the contributing person name keep the credits. Note that following the organisational non-political stand, articles relating to politics may be avoided.

<< First  < Prev   ...   2   3   4   5   6   Next >  Last >> 
  • 25 May 2021 10:53 AM | Amol Sawarkar (Administrator)

    १९५४: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचे निधन

    https://vishwakosh.marathi.gov.in/28828/

    १९९८: लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचे निधन

    https://thepostman.co.in/story-of-musician-laxmikant-kudalkar-the-postman/


  • 1 Nov 2020 8:57 PM | Amol Sawarkar (Administrator)

    forwarded by Mrs Lalita Sukathankar through the BMMS Whatsapp Group

    जन्मदिन : १ नोव्हेंबर १९२६.

    त्यांचे वडिलच पहिले गुरू होते . देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.

    आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीतसाधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला,आणि संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली.

    एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नव्हते . तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगायचे . त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर. (पूर्वाश्रमीच्या सुमन हेमाडी) त्यांनी देवांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मधुवंतीच्या सुरासुरातून श्रीरामाचे चरण धरावे आणि पक्षिणी प्रभाती चारियासी जाये ही गाणी त्यांनी गायली.

    गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी असायची तेही देव सांगत . ‘गीताचे सूर त्या गीताच्या शब्दांतच दडलेले असतात हे जाणवलं आणि शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य माझ्या डोक्यात पक्क ठसलं. पुढच्या काळात ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे देवांचं वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असत.

    देवांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. असे का घडले, याची त्यांनी केलेली कारणमीमांसा त्यांनी केली होती . त्याचा त्यांनी वास्तववादी दृष्टिकोनातून तटस्थपणे विचार केला होता. त्यांच्या मनात त्या मुळे कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे का मिळाली नाहीत याचे मुद्देसुद विवेचन त्यांनी केले आहे. अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना मिळाला होता. म्हणूनच जीवनात ही घडी अशीच राहू दे (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटातली, तू नजरेने हो म्हटले पण आणि करिते जीवनाची भैरवी ही गाणी विलक्षण गाजली.

    देवांनी समस्वरी हा नवीन प्रकार सुरु केला .मूळ हिंदी मराठी गाण्यांच्या चालींना आणि मतितार्थाला धक्का ना लावता नवीन रचना ते त्या चालीत सादर करत असत.लोकप्रिय चालींमध्ये काव्य रचण्याचे कौशल्य ते दाखवत असत.कार्यक्रम सादर करताना समोरचे श्रोते त्यांना इतरांचीही गाणी म्हणायचा आग्रह करत,त्या वेळी त्या कवींच्या कवितांवर केलेले विडंबन काव्य ते म्हणून दाखवत असत.

    सांगलीनगरीचे आराध्य दैवत म्हणजे श्री गणपती,म्हणून संकष्टी चतुर्थी दिवशी सांगली आकाशवाणी त्यांच्या आवाजातले अथर्वशीर्ष आवर्जून लावते.

    आता दोन आठवड्यांवर दिवाळी आली,अनुराधा पौडवाल यांनी गायलेले माझा मुलगा ह्या सिनेमा मधले कवी यशवंत देव ह्यांनी लिहिलेले हे गाणे सगळ्यांना आवडत असेलच.

    दिवाळी येणार, अंगण सजणार,आनंद फुलणार घरोघरी

    आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी

    रुप्याच्या ताटात, दिवा नि अक्षत,ओवाळणी थाटात घरोघरी,आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी

    रांगोळीने सजेल उंबरठा,पणत्यांचा उजेड मिणमिणता

    नक्षीदार आकाशकंदील, नभांत सरसर चढतील

    ताई भाऊ जमतील, गप्पागाणी करतील

    प्रेमाच्या झरतील वर्षासरी

    आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी

    सनईच्या सुरांत होईल पहाट,अत्तराचं पाणी, स्‍नानाचा थाट

    गोड गोड फराळ पंगतीला,आवडती सारी संगतीला

    फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील

    सौभाग्य लुटतील घरोघरी

    आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी

    देवापाशी मागेन एकच दान,भावाच्या यशाची चढो कमान

    औक्ष असू दे बळकट, नको करू ताटातूट

    चंद्रज्योती हसणार, फिक्या फिक्या होणार

    भावाविण अंधार दाटे उरी

    आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी

    अशोक चिटणीस यांनी ‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’ हे पुस्तक लिहिले आहे

    यशवंत देवांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन .

    प्रसाद जोग.सांगली.

    ९४२२०४११५०


  • 21 Sep 2019 6:01 AM | Amol Sawarkar (Administrator)

    forwarded by Mr. Vijay Joshi through the BMMS Whatsapp Group

    (इ.स. १९३५ - २० सप्टेंबर,१९९६)

    हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.

    पवार यांचे खरे नाव दगडू मारुती पवार आहे.जागल्या या टोपणनावानेही त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील धामणगाव नावाच्या खेड्यात जन्मले. संगमनेरच्या बोर्डिंगमध्ये राहून ते शिक्षण पूर्ण करीत होते. त्याला किंवा त्याच्या आईला न विचारता दगडूच्या चुलत्याने दगडूचे लग्न ठरवले. त्यामुळे विचलित होऊन पवार मॅट्रिकमध्ये नापास झाले. इंग्लिशमध्ये त्यांना पास होण्यासाठी सात मार्क कमी पडले. त्यांच्या मामा आणि आईच्या धीराने त्यांनी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली. बोर्डिंगच्या अधिकार्‍यांनी दगडूला अपवाद म्हणून बोर्डिंगमध्ये राहण्याची परवानगी दिली. मुलांच्या चिडवण्याचा त्रास होई म्हणून पवार बोर्डिंगजवळच्या एका कोंबडीच्या खुराडात बसून अभ्यास करू लागलेव इंग्रजीमध्ये ६३ मार्क मिळवले.

    मॅट्रिक नापास झालेल्या दया पवार यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

    पवार यांच्या ’बलुतं’ या आत्मकथानत्मक पुस्तकाचे अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन या युरोपियन भाषांत भाषांतरे झाली आहेत. बलुतं हे मराठीतले दलित लेखकाने पहिले प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाने मराठीत दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली.

    प्रकाशित साहित्य

    अछूत (बलुतं’चा हिंदी अनुवाद).

    कोंडवाडा (कवितासंग्रह)

    चावडी (कथासंग्रह)

    जागल्या (कथासंग्रह)

    धम्मपद (कवितासंग्रह)

    पाणी कुठंवर आलं गं बाई... (वैचारिक)

    पासंग(कथासंग्रह)

    बलुतं (आत्मकथन). ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे.

    बीस रुपये (’विटाळ’चा हिंदी अनुवाद)

    विटाळ (वैचारिक)

    पुरस्कार

    पद्मश्री

    ’बलुतं’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयासाठीचा पुरस्कार (१९७९)

    (विकीपिडीयावरुन)

    नितीन खंडाळे

    - चाळीसगाव

    ===================

    #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

    #माझीशाळामाझीभाषा


  • 21 Sep 2019 5:58 AM | Amol Sawarkar (Administrator)

    forwarded by Mr. Vijay Joshi through the BMMS Whatsapp Group

    (२१सप्टेंबर, १९३२ - ७, नोव्हेंबर १९९८)

    एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक होत.

    जन्म व बालपण

    गोव्यातल्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणार्‍या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरु केले व प्रत्येक गुरुकडून नेमकं तेवढंच घेतलं. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.

    संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दु शेरोशायरी पर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते.

    सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेऊन मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचं मर्म होतं.

    अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे.या नाटकातल्या पदांचं संगीत अभिषेकींचे होतं. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिलं. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.

    प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्र या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला. या नाटकात सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्डेड साऊंड ट्रॅक्स वापरले गेले. हे संगीत काळाच्या पुढे जाणारं होतं.

    अभिषेकींनी जसं स्वत: संगीत दिलं तसं दुसर्‍यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणी साठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु.लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले गोमू माहेरला जाते हो नाखवा हे गीतही त्यांनी म्हटले.

    आकाशवाणी वर असतांना त्यांनी अनेक कोकणी गाण्यांनाही संगीत दिलं. १९९५ सालच्या नाटयसंमेलनाचं अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती .

    सन्मान

    नाट्यदर्पण (१९७८)

    पद्मश्री (१९८८)

    संगीत नाटक अकादमी (१९८९)

    महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०)

    गोमांतक मराठी अकादमी पुरस्कार (१९९२)

    बालगंधर्व पुरस्कार (१९९५)

    सुरश्री केसरबाई केरकर पुरस्कार (१९९६)

    मा.दिनानाथ स्म्रृति पुरस्कार (१९९६)

    लता मंगेशकर पुरस्कार (१९९६)

    नाट्यपरिषदेचा बालगंधर्व पुरस्कार (१९९७)

    सरस्वती पुरस्कार(कैलास मठ नाशिक)(१९९७)

    अभिषेकींनी संगीत दिलेली नाटके

    मत्स्यगंधा

    ययाति देवयानी

    लेकुरे उदंड झाली

    वासवदत्ता

    कटयार काळजात घुसली

    मीरा मधुरा

    हे बंध रेशमाचे

    धाडिला राम तिने का वनी?

    बिकट वाट वहिवाट

    सोन्याची द्वारका

    गोरा कुंभार

    कांते फार तुला

    देणाऱ्याचे हात हजार

    महानंदा

    कधीतरी कोठेतरी

    अमृतमोहिनी

    तू तर चाफेकळी

    (विकीपिडियावरुन)

    नितीन खंडाळे

    - चाळीसगाव

    ================

    #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

    #माझीशाळामाझीभाषा


  • 15 Aug 2019 3:27 PM | Amol Sawarkar (Administrator)

    forwarded by Mr. Vijay Joshi through the BMMS Whatsapp Group

    (जन्म: डिसेंबर १५, १९०५,म्यानमार - मृत्यु:ऑगस्ट ११, १९७०)

    या मराठी लेखिका होत. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्त्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते.

    इरावती कर्वे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. 'चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण' हा विषय घेऊन त्या एम.ए झाल्या. पुढे उच्च शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. 'मनुष्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता' या विषयावर बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पी.एच.डी. प्राप्त केली. परतल्यावर काही काळ नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजात मानववंशशास्त्र या विषयाच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले.

    इरावती कर्वे यांचा जन्म म्यानमारमधील मिंज्यान येथे डिसेंबर १५, १९०५ रोजी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर होय. प्रा. दि.धों.कर्वे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

    त्यांना जाई, आनंद, गौरी अशी तीन अपत्ये झाली. गौरी देशपांडे या सुप्रसिद्ध लेखिका तर डॉ. आनंद कर्वे हे ॲश्डेन पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत.

    इरावती कर्वे यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढील प्रमाणे-

    समीक्षा ग्रंथ

    युगान्त १९७१ : महाभारतावरील समीक्षा ग्रंथ.

    ललित लेखसंग्रह

    गंगाजल १९७२

    परिपूर्ती १९४९

    भोवरा १९६४

    समाजशास्त्रीय ग्रंथ

    आमची संस्कृती

    धर्म १९७१

    मराठी लोकांची संस्कृती १९५१

    महाराष्ट्र एक अभ्यास १९७१

    संस्कृती १९७२

    हिंदू समाज एक अन्वयार्थ १९७५

    हिंदूंची समाज रचना १९६४

    याशिवाय इंग्रजी भाषेमधूनही इरावती कर्वे यांचे बारा वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

    नितीन खंडाळे

    (कॉपीपेस्ट)

    =====================

    #ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

    #माझीशाळामाझीभाषा


<< First  < Prev   ...   2   3   4   5   6   Next >  Last >>