१९२४: तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचा जन्म.
पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. त्यांंचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे नगरपालिका शाळेत झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण पार्ले टिळक विद्यालय, किंग जॉर्ज हायस्कूल मुंबई आणि महाविद्यालयीन शिक्षण बी.ए. तत्त्वज्ञान एल्फिस्टन महाविद्यालय, एम. ए. चे शिक्षण मुंबई विद्यापीठ येथे झाले.
मे.पुं. रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ठ्ये होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्विवाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला.‘
मार्च १९९६ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा-स्थिती आणि भवितव्य या विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठी स्थानापन्न होण्यात नेमका कोणता अडथळा होता याची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात आहे.
त्यांनी काही काळ ‘नवभारत’ आणि ‘क्विस्ट’ या मासिकांचेही संपादन केले. ‘नवभारत’मध्ये त्यांनी संपादकीय, लेख, पुस्तक परीक्षणे अशा विविध स्वरूपांचे लेखन केले.
त्याचबरोबर तत्त्वज्ञानावरील पाठ्यपुस्तकांचेही लेखन केले. ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’,‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’,‘स्वातंत्र्य आणि न्याय’,‘हिदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत, तर ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात नावानुसार पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास आहे.
२०११: शास्त्रीय गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे निधन
भीमसेन गुरुराज जोशी हे कर्नाटक चे भारतीय शास्त्रीय संगीताचे एक महान गायक होते. ते गायनाच्या खयाल या प्रकारासाठी प्रसिद्ध होते. सोबतच ते आपल्या प्रसिद्ध भक्तिमय भजनांसाठी हि फार पसंत केले जायचे. त्यांचे अभंगाचे गायन फार गाजले होते.
पंडित भीमसेन जोशी यांच्या “मिले सुर मेरा तुम्हारा” या गीतासाठी फार पसंत केले गेले. या गीतात बालमुरली कृष्णन आणि लता मंगेशकर यांनी साथ दिली. त्यांचे हे गीत देशाच्या प्रत्येक मनात भिडले आहे. आजही हे गाणे फार लोकप्रिय व देशभक्ती भरलेलं आहे. त्यांचे गायन सर्वांसाठी फारच प्रेरणादायक ठरले आहे.
1998 मध्ये त्यांना संगीत नृत्य व नाटकांच्या क्षेत्रात अतुल्य योगादानांसाठी भारतीय राष्ट्रीय अकॅडमी च्या संगीत नाटक अकॅडमी ने संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार व संगीत नाटक अकॅडमी शिष्यवृत्ती देवून सन्मानीत केले होते.2009 मध्ये त्यांना भारतीय नागरिक सर्वोच्च पुरस्कार “भारतरत्न” प्रदान करण्यात आला.पंडित भीमसेन जोशी यांच्या “मिले सुर मेरा तुम्हारा” या गीतासाठी फार पसंत केले गेले. या गीतात बालमुरली कृष्णन आणि लता मंगेशकर यांनी साथ दिली. त्यांचे हे गीत देशाच्या प्रत्येक मनात भिडले आहे. आजही हे गाणे फार लोकप्रिय व देशभक्ती भरलेलं आहे.
संदर्भ
https://www.mymahanagar.com/featured/meghashyam-pundalik-rege/242090/
https://www.majhimarathi.com/pandit-bhimsen-joshi-biography-marathi/
https://marathivishwakosh.org/9572/